राज्यात ८0 टक्के सरोगसीची प्रकरणे बेकायदा
घरची हलाखीची परिस्थिती, पैशांची गरज या कारणामुळे सरोगसीचा काळाबाजार महाराष्ट्रात सुरू झाला आहे. कायद्यानुसार सरोगेट मदर विवाहित असणे आणि तिला स्वत:चे एक मूल असणे बंधनकारक आहे. संबंधित महिला सरोगसीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे, जन्मानंतर त्या बाळाला जन्मदात्या आईकडे किमान तीन महिने तरी राहू देणे कायद्याने बंधनकारक आहे. पण राज्यात मात्र राजरोसपणे या कायद्याचा भंग होत असल्याचे चित्र आहे.