Showing posts with label सरोगसी कायदा. Show all posts
Showing posts with label सरोगसी कायदा. Show all posts

सरोगसी नियमन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : सरोगसी नियमन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
सरोगसी विधेयकामुळे आता भाडोत्री मातृत्वाच्या बाजारपेठेला आळा बसेल असं मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले.
भारतात 2002 मध्ये सरोगसीला मान्यता देण्यात आली. पण, त्यानंतर भारत म्हणे सरोगसीची बाजारपेठ बनली.
 अनेक अनैतिक गोष्टी समोर आल्या. त्यामुळेच या सरोगसी नियमन विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
 आता सरोगसीचा हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच असेल. तसेच परदेशी नागरिकांना, अनिवासी भारतीय, विदेशातील भारतीय वंशाच्या व्यक्ती आता भाडोत्री मातृत्वाची सवलत घेता येणार नाही.

उसन्या मातृत्वाच्या कायद्याचं काय?


स्वस्त वैद्यकीय उपचार आणि गरिबी यामुळे सरोगसी पद्धतीद्वारे मूल जन्माला घालण्यासाठी भारताची आणि भारतीय स्त्रियांची निवड करणाऱ्या परदेशी जोडप्यांची संख्या वाढल्याचं दिसत आहे. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही सरोगसीबाबत कुठलाही कायदा नाही. त्याबाबतची केवळ चर्चाच सुरू आहे. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (रेग्युलेशन) बिल अँड रुल्स २००८ हे बिल संसदेत पाठविलं आहे, पण अजूनही त्यावर चर्चा होऊन त्याला मान्यता मिळालेली नाही. सरोगसी पद्धतीने मूल जन्माला घालताना अपु-या नियमांमुळे अनेक प्रकारची कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. म्हणूनच सरोगसीबाबत लवकरात लवकर कायदा व्हावा आणि तो सर्व प्रकारच्या शक्यता लक्षात घेऊन बनलेला असावा.